भोंग्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना धमकी, ‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’
मुंबई : मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिल असून. इतकंच नाही तर मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. अशावेळी पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयने ‘हमको छेडेंगे तो हम छोडेंगे नहीं’ असा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :बँकेच्या वेळा बदलल्या, RBI चा मोठा निर्णय
याच मुद्द्यावरून, भोंग्या विषयी एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे. पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावं असं गृहमंत्र्यांनी सांगितलं. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, ‘पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये सूचना जारी करण्यात येईल.’ गृहमंत्र्यांनी यावेळी जनतेला आवाहन केलं आहे की, ‘कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’ असे देखील गृहमंत्री म्हणाले.
हेही वाचा : सहा महिन्या पूर्वी रचले होते षडयंत्र? , सिल्वर ओक हल्ला प्रकरणी धक्कादायक माहिती समोर
त्याशिवाय, भोंग्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात दुपारी 12 वाजता बैठक होणार. भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला असून. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या. राज्यातील प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय, राज्यभर भोंग्यांसंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती गृहखात्यातील सूत्रांनी दिली.
हे ही वाचा (Read This) शेवगा लागवड करून मिळवा अधिक उत्पन्न, सरकार देणार अनुदान