जालना – जळगाव रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, रेल्वे मंत्रालयाची मोठी घोषणा
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना – जळगाव रेल्वे मार्गाला हिरवा कंदील दाखवला. या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली आहे पुढील सहा महिन्याच्या आत हे सर्वेक्षण केले जाणार असून त्यानंतर कामासाठी निधी मंजूर होईल.
जळगाव आणि जालना या दोन शहरात मोठी बाजारपेठ आहे. व्यापाऱ्यांना एसटी किंवा खासगी वाहनाने सध्या प्रवास करावा लागतो. व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय येणाऱ्या काळात या रेल्वे मार्गामुळे कमी होण्याची शक्यता आहे.
जालना ते जळगाव रेल्वेमार्ग व्हावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली, लवकरच या रेल्वेमार्गाच्या कामाला सर्वेक्षणानंतर सुरुवात होईल हा रेल्वे मार्ग जालना, राजुर, भोकरदन, सिल्लोड मार्गे जाणार असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर जालना आणि जळगाव या दोन शहरातील व्यापाऱ्यासाठी दळणवळणाची व्यवस्था सोयीस्कर होईल.