पतीनेच लावले पत्नीचे दुसरे लग्न, लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीने केली विचित्र मागणी

माणूस प्रेमात आंधळा होतो, त्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक कळत नाही. ही गोष्ट तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण कन्नौजमधील एका व्यक्तीच्या बाबतीत हे खरे ठरले आहे. खरं तर, लग्नाच्या दोन वर्षानंतर एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे दुसऱ्याशी लग्न लावून दिले. लग्नानंतर महिला नवीन सासरी पोहोचली तेव्हा पहिल्या रात्री तिने पतीकडे विचित्र मागणी केली.

बाजारात कांद्याचा भाव वाढणार, व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दिवाळीपर्यंत भाव 50 रुपयांवर पोहोचणार

महिलेने आपल्या नवविवाहित पतीला सांगितले की, तिला जुन्या पतीकडे परत जावे लागेल. हे ऐकून तिच्या पतीला आश्चर्याचा धक्का बसला. कनौज येथील एका तरुणीने दोन वर्षांपूर्वी सौरीख पोलीस स्टेशन हद्दीतील चिकनपूर गावात राहणाऱ्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही काळ सगळं ठीक होतं पण हळूहळू भांडण सुरू झालं. त्यानंतर दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले. यावर दोघांच्या कुटुंबीयांनीही होकार दिला.

सासरच्या मंडळीं विरुद्ध तक्रार देण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलिसांकडून शिवीगाळ

10 ऑक्टोबर रोजी कुटुंबाच्या संमतीने महिलेने मैनपुरीच्या कुरवली पोलीस स्टेशन हद्दीतील गुलाबपूर गावातील मुलाशी दुसरे लग्न केले. हा मुलगा मुलीच्या पहिल्या सासूनेच शोधून काढला होता. लग्नानंतर नवरीचा निरोपही घेतला, मात्र ती सासरच्या घरी पोहोचताच वधूने गोंधळ सुरू केला. तिने पहिल्या पतीच्या घरी जाण्याचा हट्ट धरला. मुलीने सासरच्या घरात खळबळ उडवून दिली, प्रकरण चिघळल्याने दोन्ही पक्ष पोलिस ठाण्यात पोहोचले.

त्याचवेळी, महिलेचा नवरा आणि तिच्या मेहुण्याने आरोप केला आहे की, माजी पतीने 30 हजार रुपये घेऊन तिचे लग्न केले. तर महिलेचे म्हणणे आहे की ती पूर्वीच्या पतीसोबतच राहणार आहे. आता पोलीस या प्रकरणाचा छडा लावत आहेत. पोलिस स्टेशन प्रभारी विनोद कुमार यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप कोणीही तक्रार दाखल केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *