राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने बजावले अटक वॉरंट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट बजावला आहे. जामीन करुनही तारखांना अनुपस्तीत राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. २००८ साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी परळी कोर्टात केस चालू आहे .

जवळपास १३ – १४ वर्ष जुन्या खटल्यात आजही राज ठाकरेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आठ वर्षांपूर्वी बीडमधील अंबाजोगाईत मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे सुनावणीला हजर राहत नव्हते.

सहा वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी दुष्काळी दौरा केला होता तेव्हा त्यांनी अंबाजोगाई कोर्टात हजरी लावली होती. ३०० रुपय दंड भरून त्यांनी अटक वारंट रद्द केले होते.

रेल्वत केवळ परप्रांतीयांची भरती केली जाते अश्या वक्तव्याप्रकरणी राज ठाकरे याना २००८ मध्ये अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते, अंबाजोगाई मध्ये मनसे कार्यकर्त्यानी बसवर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले यामुळे अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांचयवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *