PSI भरती घोटाळा ; भाजप महिला नेत्या दिव्या हागारगीला पुण्यातून अटक

PSI भरती घोटाळा ; भाजप महिला नेत्याला दिव्या हागारगीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागानं सीआयडीने भाजप नेत्या दिव्या हागारगीला अटक करण्यात आली आहे. सीआयडीनं पुण्यातून अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे , दिव्या हागारगिला पुण्यात लपून बसली होती आज सकाळी तिला कलबुर्गी येथे आणलं जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अटक झालेली ती 18 वी आरोपी आहे. यापूर्वी दिव्याचा पती राजेशला अटक करण्यात आली आहे तर त्यावेळी ती पळून जाण्यात यशस्वी झाली होती. गुलबर्गा इथल्या कनिष्ठ न्यायालयाने मंगळवारी भाजप नेत्या दिव्या हागारगी यांच्यासह सहा जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होतं. त्याआधी आरोपींनी अटपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता .

हेही वाचा :- अनैतिक संबंधात आड , प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या

न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर कर्नाटक सीआयडी आरोपींचा शोध घेत होते. अखेर पीएसआय भरती घोटाळा प्रकरणी दिव्या हागारगी यांना पुण्यात अटक करण्यात आली. कर्नाटकचे गृहमंत्री अरगा जनानेंद्र यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

दिव्या हागारगी यांची ज्ञान ज्योती संस्था शैक्षणिक संस्था कलबुर्गी येथे चालवतात. दिव्या यांच्याकडे भाजप महिला युनिटचे अध्यक्ष पद होते, या प्रकरणानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. स्थानिक लोक आणि पोलीस अधिकारी सांगतात कि, दिव्या या भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. भाजपमध्ये विविध पदे देखील त्यांनी सांभाळली आहे. दिव्याने फेब्रुवारीमध्ये कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी भेट घेतली होती. भरतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हे झालं होतं.

हेही वाचा :- धनंजय मुडेंवर बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मा आंतराष्ट्रीय हनी ट्रॅप रॅकेटचा भाग?

काय आहे पीएसआय भरती घोटाळा ?
वीरेश नावाच्या परीक्षार्थीने २१ प्रश्न सोडवल्यानंतरही भरती परीक्षेत १२१ गुण मिळविल्यानंतर सीआयडीच्या चौकशीत दिव्याचं नाव पुढे आले. त्या उमेदवाराचं परीक्षा केंद्र ज्ञान ज्योती संस्था होती. वीरेशने ७ वी रँक मिळवली होती, पण चौकशीत गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्याच्या संस्थेत अनेक उमेदवारांनी गैरव्यवहार केल्याचे समोर आले.
या पीएसआय भरती घोटाळ्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत, पीएसआय पदासाठी प्रत्येक उमेदवाराकडून ६० लाख रुपयांची लाच घेतल्याचा करार झाला होता. तसंच पेपर लिहिण्यासाठी मायक्रो ब्लूटूथचा वापर केल्याची माहिती सीआयडीच्या तपासातून समोर आली होती.

हेही वाचा : वैज्ञानिक पद्धतिने करा शेळीपालन शेतकर्‍यांसाठी कमाईचा एक चांगला मार्ग बनू शकतो,जाणून घ्या कसा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *