खा. संजय राऊत याची पुढची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयाबाहेर .?

खा संजय राऊत यांनी कालच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू याना पत्र लिहून ईडी कडून होणाऱ्या कारवाईवर लक्ष देण्याची विनंती केलं आहे.
आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले असून भाजपकडून तपास यंत्रनेचा गैरवापर कसा होतोय याचा पर्दाफाश लवकरच करणार असल्याचं सांगितलं .

तुम्ही मुंबईत दादागिरी करता मुंबईत फक्त शिवसेना दादा आहे हे लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय हे भयंकर आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना दिलेल्या पत्रानंतर महाराष्ट्रातील प्रमुख लोकांचे मला फोन आले. महाराष्ट्र सरकार आल्यापासून त्यांना त्रास होतंय मी त्यांची वेदना समजू शकतो.
ईडीच्या माध्यमातून क्रिमिनल सिंडिकेट चालवत असल्याचा आरोप करत पुढची पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेणार आणि नंतर होणारी पत्रकार परिषद ईडीच्या कार्यलयाबाहेर घेणार असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या पालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचे भाग बनले. लवकरच कशाप्रकारे यांचे स्वतःचे आर्थिक घोटाळ्यात भाग आहेत. आणि कशाप्रकारे ब्लॅकमेल करतात ते धमक्या देतात सगळ्यांना पैसे गोळा करतात आणि ह्यांचे वसुली एजंट आहे, हे सगळं हळूहळू बाहेर येईल. असा गौप्यस्फोट केला.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ठाकरे कुटुंबायाना देखील त्रास दिला जातीय पण हे सरकार पडणार नाही. असे संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हंटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *