महाविकस आघाडी सरकार अल्पमतात, ३८ आमदारानी काढला पाठिंबा

सध्या राजकीय स्थिती पाहता राजकीय भूकंप सुरु आहे, आता तब्बल ३९ आमदार शिंदे गटात गेले आहे. कालच उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत देखील शिंदे गटात गेले, आज शिंदे गटाने केलेल्या याचिकेची सुनावणी आहे. या याचिकेत शिंदे गटाने ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतलं आहे असे सांगितल्या जात आहे. तसेच प्रतोत पद आणि आमदारांना बजावलेल्या नोटीस वर देखील या याचिकेत प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. एकनाथ शिंदे यांनी या याचिके सोबतच संजय राऊत यांच्या प्रक्षोभक भाषणांच्या लिंक देखील कोटात दिल्या आहे.

7 वा वेतन आयोग: 18 महिन्यांच्या डीए थकबाकीबाबत अपडेट, पगारात 1.50 लाख रुपये येणार ! निश्चित

तसेच, ठाकरे आणि शिंदे यांनी मोठे वकील देखील या प्रकरणी कोर्टात उतरवले आहे. सरकारने पाठवलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर उपसभापतींनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. शिंदे यांचा दावा आहे की, उपसभापतींच्या कृतीवरून ते महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकारसोबत असल्याचे दिसून येते.

कोरोनाचा कहर थांबत नाही, २४ तासांत 6 हजारांहून अधिक नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या २४ हजारांवर

उपसभापतींनी जारी केलेली अपात्रतेची नोटीस घटनेच्या कलम 14 आणि 19(1)(जी) चे पूर्ण उल्लंघन करणारी आहे, तसेच चौधरी यांना शिवसेनेचा नेता म्हणून मान्यता देणे ही उपसभापतींची बेकायदेशीरता आहे, असे शिंदे यांच्या याचिकेत म्हटले आहे. ही घटनाबाह्य कृती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *