प्रियकराचा लग्नास नकार प्रेयसीसह पाच मैत्रिणींनी केलं विष प्राशन तिघींचा मृत्यू

औरंगाबाद : प्रियकराने लग्नाला नकार दिला, त्यानंतर प्रेयसीसोबत तिच्या सहा मैत्रिणीने विष प्रश्न केले. त्यात तिघींचा मृत्यू झाला असून, उर्वरित तिघींवर उपचार सुरु आहे. हि घटना बिहार राज्यातील औरंगाबाद येथील एका खेडे गावात घडली.

हाती आलेल्या माहिती नुसार, तरुणीला तिच्या वहिनीचा भाऊ आवडत होता. त्याला प्रपोस करण्यासाठी तिच्या सहा मैत्रिणींना सोबत घेऊन ती औरंगाबादला गेली. तिथे त्या तरुणाला तिने लग्नाची मागणी घातली. तरुणाने लग्नासाठी साफ नकार दिला. त्यामुळे नकार ऐकून सहाही जणी नाराज झाल्या. नंतर त्या सर्व मैत्रिणी गावी परतल्या, निराश झालेल्या तरुणीने विष प्राशन केले. तिची साथ देत पाठोपाठ तिच्या पाच मैत्रीनें देखील विष पिले.

दरम्यान, हि बाब काही वेळातच गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातील काही नागरिकांनी जवळच्या रुगणालयात सर्व तरुणींना दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिघींचे मृत घोषित केले उर्वरित तीन जणीची परिस्थिती गंबीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली, तसेच त्यांनी विष कुठून आणले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *