अनिल देशमुखांवरचे आरोप खोटे?, क्लीन चीट मिळण्याची शक्यता

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या लेटरबॉम्बची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चांदीवाल कमिशनचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे खोटे असल्याचं नमूद आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे चुकीचे असल्याचं नमूद आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर आरोप करताना त्यांनी 100 कोटी रुपये वसुलीचा आदेश देण्यात आल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचा : खा. नवनीत राणा यांनी पोलिसांवर केलेले आरोप खोटे? मुंबई पोलीस आयुक्तांनी व्हिडीओ केला ट्विट

दरम्यान चांदीवाल कमिशनने या सर्व आरोपांची चौकशी करताना अनेक पुरावे तपासले. तसेच अनेक साक्षीदार तपासले. या अहवालानंतर अनिल देशमुखांना एक दिलासा मिळण्याची शक्यता आहे असून. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २० मार्च २०२० रोजी एक पत्र लिहून मुंबईतील १७५० बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा १०० कोटींची वसूली करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा आरोप करत एक लेटरबॉम्ब फोडला.

हेही वाचा : युरिया ऐवजी गोमुत्राचा या पद्धतीने करा वापर, मिळवा भरघोस उत्पन्न

तसेच , देशमुखांनी हे काम पोलीस निरीक्षक सचिन वाझेकडे सोपवल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं. या राजकीय भूकंपानंतर देशमुखांवर चोहोबाजूनं टीका करण्यात आली त्यातच देशमुखांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला असून. मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. तर राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के. यू. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एका चौकशीआयोगाची स्थापना करत याची समांतर चौकशी सुकी केली. परमबीर सिंह यांनी कोणत्या आधारे आरोप केलेत?, त्याबाबत त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का?, देशमुख आणि इतर सह आरोपींनी या आर्थिक व्यवहारांबाबत काही खुलासे केले आहेत का? याची चौकशी हा आयोग करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *