शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईतल्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा पार पडली . जवळपास एक तास केलेल्या भाषणात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. एकंदर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात फडणवीसांना आणि भाजपला टार्गेट केलं.
एक खोटं हिंदुत्व मुखवटा घातलेला पक्ष आपल्या बरोबर होता तो देशाची दिशा भरकटवत आहे.
आमचं हिंदुत्व गदाधरी होत आम्ही गधा सोडून दिले…घोड्याच्या आवेशात जी गाढव होती..त्यांना आम्ही लाथ मारून सोडून दिले
भाजप सभेत फडणवीस बोलून गेले आम्ही मुंबई स्वतंत्र करणार .तुमच्या मालक सकट कोणी आले तरी..मुंबई हौतात्म्य पत्करून मिळवली..जो लचका तोडेल त्याचे तुकडे होतील ..
घोड्याच्या आवेशात जी "गाढवं" आमच्या सोबत होते त्यांना लाथ मारून अडीच वर्षांपूर्वी आम्ही बाहेर पडलो.. pic.twitter.com/i4vGpsofJQ
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) May 14, 2022
फडणवीस यांना विचारायचं आहे
संघ स्वातंत्र्यपूर्व काळात होता,तो स्वातंत्र्य संग्रामात उतरला नाही..संयुक्त महाराष्ट्र लढ्यात नव्हता..जनसंघ म्हणून होता..तेव्हा शिवसेना नव्हती पण बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे प्रबोधनकार आजोबांना मदत करत होते .
संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली..त्यातून सगळ्यात आधी जनसंघ फुटले जागा वाटप वरून भांडले..हे तेव्हापासून मुंबई लचका तोडण्याचा मनसुबा आहे .हे चुकून वाक्य नाही..पोटातील ओठावर आले आहे
महागाई मुद्द्यावर कोणीच बोलत नाही
गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना बैठक घेतली.. पंतप्रधान अचानक महागाई वर बोलले..पेट्रोल,डिझेल दर कमी करा..म्हणजे GST देणे देणार नाही, तुम्हाला मुंबई ओरबडायची आहे
आमची २५ वर्ष युती मध्ये सडली..पण हिदुत्वाचा बुरखा फाटल्यवर भेसूर चेहरा दिसत आहे…
हे जसे अंगावर येतात तसे सामना मधून कधी टीका झाली का..हेच तर संस्कार आहेत
शिवसेना बाळासाहेबांची नाही
मग तुमचा भाजप तरी अटलजी यांचा राहिला आहे का?
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मध्ये जे शिकले ते गेले कुठे? काय शिकवलं? इतकं खोटं बोलत आहे..हे ह्यांचे हिंदुत्व..
काश्मीर मध्ये सरकारी कार्यालयात घुसून हिंदूंना मारल मग आता हनुमान चालीसा वाचायची का? हे काश्मीर फाईल्स पुढचं पाऊल आहे का?
तो ओवेसी गेला..औंरगजेब थडग्यवर गेला..बी टीम,सी टीम सगळ्यांना पुढे करतात म्हणजे कारवाई त्यांच्यावर हे बोलायला मोकळे .. तोंडाला सॉस लावून पत्रकार परिषद घेतात.. ह्यांना झेड सुरक्षा देतात..काश्मीर मधील हिंदूंना सुरक्षा देणार का
तुम्ही ढकलल म्हणून काँग्रेस बरोबर गेलो.. हिंदूत्व म्हणजे धोतर आहे का.. कधी नेसल कधी सोडलं…काँग्रेस मध्ये उघड गेलो.. तुमचया सारखे सकाळी नाही गेलो..तुम्ही सकाळी शपथविधी केला चालतो.सकाळचा शपथविधी यशस्वी झाले असते तर नवाब मलिक,अनिल देशमुख मांडीला मांडी लावून बसले असते
नितीश कुमारने तुमच्या भोंग्यात पाणी ओतलं हिंमत आहे का बोलायची.. मेहबूब मुफ्ती तुमच्या कानात वंदे मातरम् बोलतात का .. मी बोललो तर मिरच्या लागतात..आम्हाला आव्हान दिले म्हणून सरकार स्थापन करून दाखवला..
अयोध्या मी गेलो होतो, म्हणता….काय वय होत? शाळेची सहल होती का? चला चला अयोध्या बघायला चला ..बाबरी गेला असता..तुम्ही नुसता चढायचा प्रयत्न केला असता एक पाय टाकला असत तर पडली असती
जुने मातोश्री होत..बाबरी पडली मी जाऊन बाळासाहेबांना सांगितल..तेव्हा त्यांना फोन आला..ते म्हणाले शिवसैनिकांनी पाडली असेल तर अभिमान आहे.. बाळासाहेब म्हणाले जो नेता भडकवून नंतर जबाबदारी घेत नाही..हे असे नेतृत्व असत नाही
हिंदुत्व टोपी मध्ये नसत..भगवी टोपी घालून हिंदुत्व दाखवता मग RSS टोपी काळी का?
तुमचं विकृत हिंदुत्व आम्हाला मान्य नाही..
मनोरुग्ण आहेत ही लोक..
ज्यांच्यावर विश्वास टाकला तेच केसाने गळा कापणार असेल तर विश्वास कसा ठेवायचं ?
एक मुलीने शरद पवार यांच्यावर विकृत विधान केलं..घरी आई वडील आहेत की नाही ..काही संस्कार देतात की नाही..हे टाळले पाहिजे…करून करून भागल मग देवपुजेला लागले
आता दाऊदच्या मागे लागले..दाऊद म्हणाला मी भाजप मध्ये येतो मग उद्या दाऊद पण मंत्री बनवतील..कदाचित त्यासाठी दाऊदच्या मागे लागले असतील.
स्वतः हनुमान पुत्र कसे म्हणवून घेता..बाबरी पाडल्यावर शेपूट घालून बसले होते .तेव्हा वीतभर नाही लांबपर्यंत पळून गेले होते
सॉस फोटो आल्यावर पत्र आले इतकिंसूर्क्ष असताना हलला कसा झाला..सुरक्षा तुम्ही दिली आम्हाला काय विचारता..राहुल भट सुरक्षा दिली का?
बोंबालयच नुसत…आम्ही संयम बाळगतो म्हणजे नामर्द नाही…अंगावर कोणी आल तर सोडत नाही…आम्ही तुमच्या कुटुंबियांच्या मागे गेलो नाही .केवळ सत्ता मिळत नाही म्हणून जे चालू आहे एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र विद्रूप करत आहे..शिवरायांचा महाराष्ट्र बदनाम करत आहेत
काहींना बाळासाहेब दिसतात कधी शाल घेऊन फिरतात कधी मराठी तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात..
या मुन्नाभाईचा केमिकल लोच्या झाला आहे.. जाऊ दे अयोध्येला राज ठाकरे यांना टोला
प्राचीन मंदिर आपण चांगली करण्याचा प्रयत्न करत आहे पण केंद्राच्या पुरातत्व खात्याने खोडा घातला..मंदिर जीर्णोद्धार करणार आहोत..
बोंबलयचे असेल तर कांजूर जागेसाठी बोला ..राज्याचे कित्येक प्रकल्प अडवून ठेवले आहेत..
बोबद्यांकडे लक्ष देऊ नका. एकाग्रता भंग करायला बोलत आहे..ह्यांना काही करता येत नाही .शिवसेना जाणार,शरद पवार जाणार,काँग्रेस फुटणार…एडी मागे लावत आहे..मग आम्ही सोडणार नाही .हे अजेंसी आमच्या मागे लावणार.मग दया माया क्षमा देणार नाही
गलिच्छ राजकारण सोडा,श्रीलंकेत काय सुरू आहे बघा…आमचं हिंदुत्व घर पेटवणारे नाही..पेटवा दंगली…घर जळेल .पोट कसे भरणार.. उज्वला योजना वाट लागली
हे मुद्दाम सुरू आहे, महाराष्ट्र पेटत का नाही म्हणून
लोक देश सोडून चालले आहेत, रोजगार जात आहे..लोकांची माथी भडकवू नका..लोकांच्या हातात धोंडे दिले नंतर ते तुमच्या माथी मरतील