धक्कादायक | खिचडीत मीठ जास्त झाले म्हणून पत्नीचा खून

सासऱ्याला वेळेत चहा, नाश्ता न दिल्याच्या रागातून गोळी झाडून सुनेची हत्या केल्याची घटना ताजी असून काल सुद्धा मुंबई जवळच्या भाईंदर येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली. खिचडीत मीठ जास्त झाल्याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केली. निलेश घाग असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.

हेही वाचा :- राज्यातील ‘या’ शहरात लाखोंची बनावट दारू जप्त

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत निलेश आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी नाश्त्यामध्ये साबुदाणा खिचडी बनवली. ही खिचडी खारट झाली म्हणून रागाच्या भरात निलेश याने पत्नीची कापडी पट्ट्याने गळा आवळून हत्या केली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. या प्रकरणी निलेश घाग याला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा :- आमदार पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

दरम्यान, खिचडीमध्ये मीठ जास्त झाल्यामुळेच हत्या केली की, हत्या करण्यास आणखी काही वेगळे कारण होत, याचा तपास पोलीस करत आहे. नवघर पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश मसाल यांनी याबाबत माहिती दिली.

हेही वाचा :- कृषी तंत्रज्ञान: सेन्सरवर आधारित सिंचन पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार ! 👇🏼👇🏼

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *