विराट कोहलीची मोठी घोषणा

एकदिवसीय आणि टी 20 कर्णधारपदानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. आज विराट कोहलीने ट्वीटरवरून कसोटी कर्णधारपद सोडल्याची माहिती दिली.

विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्याची माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.यात  विराट कोहलीने बीसीसीआय आणि चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्यासोबत आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे.  तसेच विराट कोहलीने सांगितले की,  ‘ मागील सात वर्षांपासून भारतीय संघाला योग्य दिशेला घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला. मी माझी जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण केली आहे.” मला इतक्या मोठ्य कालावधीपर्यंत संधी दिली, त्याबद्दल बीसीसीआयचे आभार व्यक्त करतो.

https://twitter.com/ANI/status/1482341335126654977?t=2hxQsM4EMPxXTxi2DD5yVg&s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *