हे दाऊद समर्पित सरकार ; देवेंद्र फडणवीस यांची टीका

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एखादा मंत्री जेलमध्ये असताना सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही हे दुर्दैवी आहे. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीं जन्मठेपेत आहे. अशा लोकांकडून कवडीमोल भावाने जमीन विकत घेऊन. त्यावर कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसीना पारकर यांना ५५ लाख रुपये द्यायचे हे पैसे कुठे वापरले गेलेत ? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली.

हेदाऊद समर्पित सरकार आहे असं आम्हाला म्हणावं लागेल. म्हणून आम्ही मागणी लावून धरली आहे नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे.

संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते तरीदेखील नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला. याठिकाणी नवाब मलिक जेलमध्ये आहे कुणाच्या नावाखाली नवाब मालिक यांना वाचविले जातंय ? हे आम्ही विचारणार आहोत. असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *