वाद इतका विकोपाला की , मुख्याध्यापकाने घेतला शिक्षकाच्या अंगठयाला चावा

शाळेत असताना विद्यार्थ्यांची भांडण होत असतात मात्र या घटनेत काही वेगळंच घडले आहे. या भांडणात शाळेच्या मुख्यध्यापकाने सहकारी शिक्षकाला चावल्याची घटना घडली आहे. या चावल्याच्या प्रकारांमुळे शिक्षक मुख्याध्यापकाचे भांडण चांगलेच चर्चेत आहेत.

या झालेल्या भांडणात मुख्यध्यापकाने शिक्षकाच्या अंगठ्याला चावा घेतला आहे. शाळेच्या कॅटलॉग बाबबीत त्यांच्यात वाद झाले त्याचे रूपांतर भांडणात झाले. हा वाद एवढा विकोपाला गेला. येवला तालुक्यातील नगरसूल येथील हि घटना आहे. मुख्याध्यापक सुरेश अहिरे यांनी चावा घेतला आहे, तर ब्रह्मचैत्यन्य राजगुरू असे शिक्षकांचे नाव आहे.

या प्रकरणी मुख्यध्यापकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या भांडणात जखमी झालेले शिक्षक राजगुरु यांच्या अंगठ्यातून रक्त आल्याने तेथे जखम झाली आहे. शिक्षकाने मुख्याध्यापक यांच्या विरोधात येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकराणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *