बदलापुरात गदारोळ, अकोल्यातील लाजिरवाणी घटना… विद्यार्थिनींना शिक्षक दाखवायचा अश्लिल व्हिडिओ

महाराष्ट्रातील बदलापूरनंतर आता अकोल्यात शाळकरी मुलींसोबत लज्जास्पद घटना घडली आहे. येथे सरकारी शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत असे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुमारे चार महिन्यांपासून शिक्षक हे कृत्य करत होता, असा आरोप आहे. विद्यार्थिनींनी बाल कल्याण समितीला बोलावून संपूर्ण हकीकत सांगितली. बालवाडीतील दोन मुलींच्या लैंगिक शोषणावरून बदलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असताना ही घटना उघडकीस आली आहे.

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अकोल्यातील काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेत घडली. येथे एक 47 वर्षीय शिक्षक चार महिन्यांपासून शाळेतील सहा विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत होता. तो विद्यार्थिनींना व्हिडिओ दाखवण्यास भाग पाडून त्यांची छेड काढत असे. याला कंटाळून विद्यार्थिनींनी बाल कल्याण समितीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन …

बदलापुरात दोन शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणानंतर तीव्र आंदोलन, 10 गाड्यांचे बदलले मार्ग

विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर शिक्षकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चौकशीनंतर आरोपी शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनीही या शिक्षिकेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
बदलापुरात लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर संतापाच्या उधाण आलं.

यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे एका शाळेतील परिचराने बालवाडीत शिकणाऱ्या तीन आणि चार वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मुलींनी याबाबत पालकांना सांगितले तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले, त्यानतर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये कारवाई केली आहे. 17 ऑगस्ट रोजी, दोन बालवाडी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका शाळेतील परिचराला अटक केली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

या घटनेची माहिती संपूर्ण परिसरातील लोकांना समजताच ते रस्त्यावर उतरले आणि हजारो आदोलकांनी बदलापूर स्थानकावर रेल्वे ट्रॅक अडवला. त्यामुळे लोकल ट्रेन सेवा ठप्प झाली लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलावे लागले, बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करून शाळेच्या इमारतीची तोडफोड केली. पोलिसांनी नऊ तासांनंतर रेल्वे स्थानकावर आदोलकांवर लाठीचार्ज करून आंदोलन संपवले. या संपूर्ण प्रकरणाबाबत विरोधी पक्षांनी आरोप केला की, पीडित मुलींच्या पालकांना बदलापूर पोलिस ठाण्यात 11 तास थांबावे लागले, त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार नोंदवली.

बदलापूर घटनेवर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘हे सरकार मुलींसाठी माझी लाडकी बहिन योजना आणत आहे…

या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने माफी मागितली आहे
शाळेच्या व्यवस्थापनाने या घटनेबद्दल माफी मागितली असून, ज्या फर्मला हाऊसकीपिंगचा ठेका देण्यात आला होता त्या फर्मला काळ्या यादीत टाकल्याचेही सांगितले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या परिसरात दक्षता वाढवण्यात येणार असल्याचे शाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळेच्या व्यवस्थापनाने या घटनेनतर मुख्याध्यापक, एक वर्ग शिक्षक आणि एक महिला परिचर यांना निलंबित केले, तर राज्य सरकारने एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

झोन 4 चे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी सांगितले की, एफआयआर नोंदवल्यानंतर साडेतीन तासांत आरोपीला पकडण्यात आले. बदलापूरच्या लोकांनी रस्त्यावर उतरणे किंवा आंदोलनात भाग घेणे टाळावे, कारण यामुळे तपास प्रक्रियेत अडथळा येतो. पोलीस प्रशासन या प्रकरणाचा छडा लावण्यात गुंतले आहे.

शिवस्वराज्य यात्रेदरम्यान टळला मोठा अपघात, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे थोडक्यात बचावले.

उद्धव ठाकरे म्हणाले- खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात झाली पाहिजे.
बदलापूरमधील शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची त्वरीत सुनावणी झाली पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, एकीकडे राज्य सरकार योजना राबवत आहे, तर दुसरीकडे बहिणी-मुली सुरक्षित नाहीत. काही राज्यांना लक्ष्य करून महिलांवरील गुन्ह्यांवर राजकारण केले जात आहे.

पोलिसांच्या कारवाईवरून राज्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली. अंबादास दानवे यांनी सरकार आणि पोलिसांवर निशाणा साधत आपला पक्ष सत्ताधारी आघाडीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *