औरंगाबाद जिल्हयात भीषण अपघात ६ जणांचा मृत्यू , १४ जण जखमी

औरंगाबाद :- सिल्लोड कन्नड महामार्गावर भीषण अपघात झाला, या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचबरोबर या अपघातात १४ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.

घाटशेंद्रा येथून लग्न लावून मंगरुळकडे परतणाऱ्या भरधाव पिकअप टेम्पोने गुरुवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात भीषण असल्याने यात टेम्पोतील ६ वऱ्हाडी मंडळींचा जागीच मृत्यू झाला. तर १४ वऱ्हाडी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातातील मृतांची नावे :-
जिजाबाई गणपत खेळवणे वय ६०वर्ष , संजय संपत खेळवणे ४२ वर्ष , संगीता रतन खेळवणे ३५ वर्ष , लक्ष्मी बाई अशोक खेळवणे ४५ वर्ष , अशोक संपत खेळवणे ५२ वर्ष , रंजना बाई अशोक खेळवणे ४० वर्ष हे सर्वजण मंगरूळ येथील रहिवासी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *