पत्नीने केली पतीची हत्या, खांबाला बांधून गळा आवळला

अमरावती : अमरावती जिल्यातील तिवसा तालुक्यातील मोझरी गावात एक धक्कादाय घटना घडली. पत्नीनेच पतीचा गळा आवळून हत्या केली. पती दारू पिऊन पत्नीला त्रास देत असल्याने पत्नीने हा खून केला अशी माहिती समोर येत आहे. माधुरी वंजारी असे आरोपी महिलेचे नाव आहे.

या दाम्पत्याचे लग्न १४ वर्षापूर झाले होते. तेव्हापासून त्या महिलेला तिचा पती दारू पिऊन त्रास देत होता, या कारणामुळे महिला माहेरी निघून आली गेल्या काही वर्षांपसून ती माहेरीच होती, तरी तिचा पती तीला माहेरी येऊन त्रास देत असे, महिला एका कंपनीत काम करून मुलांचे पालन पोषण करत होती. नेहमीच्या त्रासाला कंटाळून आरोपी महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले, हत्येआधी या महिलेनं आपल्या पतीचं शरीर एका खांबाला दोरखंडानं बांधून ठेवलं होतं. हत्येआधी तिचा पती दारु पिऊन आला असावा, अशीही शंका घेतली जातेय.

ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली तो सुनील वंजारी हा इसम पांढरी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. आईनंच वडिलांचा जीव घेतल्यामुळे आत दोन मुलांचं काय होणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक झालेल्या दोन मुलांवरचं छत्र हरपलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *