एप्रिल महिन्यात ‘या’ शाळा असतील सुरु
मुंबई : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. ते भरून काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून, एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली. मात्र ज्या शाळेचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे त्या शाळेला सुट्टी देता येणार आहे. असा निर्णय आज शिक्षण आयुक्तांनी घेतला
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता शाळा सुरू झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक देखील मागणी करत होते. त्यानुसार एप्रिल महिना आणि रविवारीही शाळा सुरु राहणार आहेत. मात्र आज घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.