संप मागे घ्या नाहीतर… , नितीन राऊतांचा वीज कर्मचाऱ्यांना इशारा
वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने काल देशभरात त्यांनी दोन दिवशीय संप पुकारला आहे. या विषयावर काल ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत कर्मचारी संघानेची बैठक झाली. तरी त्या बैठकीत काही तोडगा निघाला नाही आणि कर्मचारी अद्यापही संपावर आहे. यावर नितीन राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
मंत्री नितीन राऊत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले केली, कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि चर्चेसाठी पुढे यावे, चर्चा करून आपण मार्ग काढू. सध्या राज्यात दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहे. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने विध्यार्थ्यांना त्रास होत आहे. कोळस्याची देखील टंचाई आहे. त्यामुळे संप मागे घेऊन पुन्हा कामावर यावे, तसेच कामावर न आल्यास मेस्मा अंतर्गत कारवाई करू असा इशारा देखील नितीन राऊत यांनी दिला आहे.
काल बदलापूर येथे तब्बल ५ तास वीजपुरवठा बंद होता, या वर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक नागरिकांनी कर्मचारी, अभियांता तसेच महावितरण कार्यालयात संपर्क केला तरी काही प्रतिसाद नागरिकांना मिळाला नाही, तब्बल ५ तासांनी बदलापूर येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.