केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर केलं त्यातील महत्वाचे मुद्दे

* या बजेट मध्ये देखील इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
*क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून मिळवलेल्या उत्पन्नावर 30 टक्के कर
*ITR मधील चूक सुधारण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी
*कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याची घोषणा
*डिजीटल रुपींची घोषणा, रिझर्व्ह बँकेकडून आगामी वर्षात डिजीटल रुपी सुरू होणार
*इलेक्ट्रीक वाहनांसाठी बॅटरी अदलाबदली धोरण लागू करणार, मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन नसल्याने वाहन चालकांची होणारी गैरसोय दूर होणार
*ई-पासपोर्ट २०२२-२०२३ पासून लागू केले जातील
*पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध होणार
*2022 मध्ये 5G सेवा सुरू होईल
* पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन ट्रान्सफर करता येणार
* शेतकऱ्यांना डिजिटल सेवा दिली जाईल, शेतकऱ्यांकडून विक्रमी खरेदी केली जाईल
* नाबार्डच्या माध्यमातून स्टार्टअपना मदत करणार
* जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 9 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार
*पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ हजार कोटींची नव्याने तरतूद
* शालेय शिक्षणासाठी १०० टीव्ही चॅनेलची घोषणा, स्थानिक भाषेतून शिक्षण देणार
* लघु आणि सुक्ष्म उद्योगांना दोन लाख कोटींचे अर्थसहाय्य
* तेलबिया निर्मितीला प्राधान्य देणार, पिकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करणार
* हा अर्थसंकल्प 2047 पर्यंतचा हा ब्लूप्रिंट
* पुढील आर्थिक वर्षात 9.2% विकास दर अपेक्षित आहे
* ऊर्जा, वाहतूक, विपणन यावर भर दिला जाईल
* विविध शहरांची गरज ओळखून मेट्रोचे जाळ उभारणार
* ‘पंतप्रधान गती योजने’तंर्गत पायाभूत सुविधा उभारणार, पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटींचा निधी
* आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देत 60 लाख नवे रोजगार निर्माण करणार
2023 पर्यंत 25 हजार किमीचा महामार्ग उभारणार
* एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात आणणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *