पोलीस भरती संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील शुक्रवारी अहमदगनर जिल्ह्यात दौरा केला. दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगर पोलिसांच्या कामाचा आढावा घेतला. यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यात पोलीस भरती संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लवकरच ७ हजार २०० पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. नुकताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून सध्या ५ हजार २०० पदासाठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही भरती पूर्ण झाली झाल्यानंतर लगेच ७ हजार २०० पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं. पोलीस भरतीसाठी तयारी करत असलेल्या तरुण तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

पोलीस भरती प्रक्रिया सुरु होण्यासंदर्भात गृहमंत्री यांनी दिलेल्या माहितीमुळं पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *