महाराष्ट्र

सरकार म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही का? मनोज जरांगे बरसले!

Share Now

`
मनोज जरांगे पाटील: विरोधकांनी बैठकीत जायला हवे होते पण गेले नाही. म्हनून तुम्ही आम्हाला कारण सांगणार का? सरकार म्हणून तुम्हाला लाज कस वाटत नाही. तुम्ही रोष का अंगावर घेत आहे अशी टीका करत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर सागेसोयची अंमलबजावणी घेणारच आहे. मी सरकारला सावध करतोय, असा इशारा त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेश्याच्या अंमलबजावणी बाबत सरकारला दिलेल्या इशार्याचा आज्ज शेवटचा दिवस आहे. यामुळे मनोज जरांगे यांनी सरकारवर आज निशाना साधला

मानिज जरांगे म्हणाले कि, आज सरकारकडे पूर्ण दिवस आहे, पुढील निर्णय काय घ्यायचा? बोलून घेईल त्यामुळे आजच्या दिवशी काहीच बोलता येणार नाही. र्यालीचा पुढील टप्पा पच्छिम महाराष्ट्र असेल शिंदे गटाने नोंदणी शोधण्याचे काम सुरु करावे. मुलींच्या मोफत शिक्षणाचा विषय आहे. सर्व जातीच्या मुलांना न्याय मिळावा. असे त्यांनी म्हंटले आहे.

सरकारला आताच सावध करतोय, मनोज जरांगे पाटील यांचा अखेरच्या दिवशी धमकीवजा हा इशारा.

सरकारला मराठयांचा रोष पडणार नाही
मराठा आरक्षणा बाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक उपस्थित नव्हते.याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले कि, विरोधकांनी बैठकीत जायला हवे होते. पण ते गेले नाही. म्हणून तुम्ही ते कारण सांगणार का? तुम्ही सरकार आहात. विरोधक नाही आले तरी तुम्ही सांगितले पाहिजे, त्यांचे कारण सांगून तुम्हाला द्यायचे आहे नाही का? तुम्ही का मराठयांचा रोष अंगावर घेताय. सरकारला मराठयांचा रोष परवडणार नाही. तुम्ही जर आरक्षण दिले नाही तर १०० टक्के २८८ उमेदवार पडणार आहे मराठ्यांच्या मताच्या जीवावर आताचे आमदार झाले. असे निशाना त्यांनी सरकारवर साधला.

शेतकऱ्यांना पिस्तुलाने धमकावल्या संधर्भात IAS पूजा खेडकरच्या पालकांविरुद्ध FIR.

त्यांना संविधानाने दिलेले अधिकार
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सगेसोयरे अध्यादेशाला विरोध केला. याबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, द्या म्हणण्याचा नाही म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांना वाटलं असेल नाही द्यावे, म्हणून ते नाही म्हटले. त्यांना संविधानाने दिलेला अधिकार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

महाशांतत रैली निमित्य संभाजीनगरात हे असेल बंद!.

सरकार लबाड, ओबीसी नेत्यांना आमच्या अंगावर घालतंय
ते पुढे म्हणाले की, राज्यात मराठ्याच्या हातात पॉवर राहिली पाहिजे ही माझी भूमिका आहे. सगेसोयरे उडणारे असेल तर रद्द करा मागणी का होते? छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) का झोपत नाहीत. मी मराठ्यांना काहीना काही देऊ शकलो. 100 टक्के मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिले आहे. मी काहीना काही समाजाला दिले ना. तुमच्यासारखं अर्ध्यात तर आंदोलन सोडले नाही ना? काही जणांना माझं आंदोलन पचणीच पडेना. 40 वर्ष तुम्ही काय केलं? जर आरक्षण उडणारे असते तर ओबीसीचे नेते एकत्र आलेच नसते. सरकार लबाड आहे. ओबीसींच्या नेत्यांना आमच्या अंगावर घालतेय. ओबीसींनी समजून घ्यावं विरोध केला नाही. तरी मराठ्यांचेच सरकार येणार, म्हणून तुम्ही विरोध करू नका. इतका मग्रूरराज कधीच असू नये, महिला रस्त्यावर उतरून सरकार ऐकत नाही. विरोधी पक्षाला 70 वर्ष मतदान केले. भाजप मधल्या सामान्य मराठ्यांना वाटायला लागले, हे कामाचेच नाही. सरकार ला सकाळी उठायला वेळ लागतो.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *